Description
या वर्षी 1 मे 2020 रोजी महाराष्ट्र राज्य निर्मितीला साठ वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणजेच महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या हीरक महोत्सवी वर्षाची या दिवशी सांगता होत आहे. आपले महाराष्ट्र राज्य म्हणजे नररत्नांची खाण आहे. आपल्या महाराष्ट्रातील अनेक थोर व्यक्तींनी आपल्या कार्य कर्तृत्वाने स्वत: बरोबरच महाराष्ट्राचे नाव मोठे केले . या व्यक्ती म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या खाणीतील हिरे आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये. महाराष्ट्र राज्य निर्मितीला साठ वर्षे पूर्ण होत असल्याने महाराष्ट्राला भूषणावह असलेल्या विविध क्षेत्रातील साठ व्यक्तींविषयी मी त्यांच्या नावातून कवने रचली आहेत आणि त्याचा एकत्रित ‘ हिरेजडित महाराष्ट्र’ हां काव्यसंग्रह तयार केला आहे. ‘ जडित ‘ येथे मला कार्यकर्तृत्वाने वजनदार झालेला, असा अर्थ अभिप्रेत आहे .
Reviews
There are no reviews yet.