अण्णा भाऊ साठे निवडक वाङ्मय : कादंबरी खंड – 2

225.00

Out of stock

पुस्तकाचे नाव अण्णा भाऊ साठे निवडक वाङ्मय : कादंबरी खंड – 2
लेखक अण्णा भाऊ साठे
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पुठ्ठा बांधणी
पानांची संख्या ९२२
आकार ५ * १० इंच
वजन १८७० ग्रॅम

Description

1 ऑगस्ट 1920 ला वाटेगाव जिल्हा सांगली येथे जन्मलेल्या अण्णा भाऊ साठे यांचे 18 जुलै 1969 ला मुंबईत निधन झाले. अवघे 49 वर्षाचे आयुष्य जगलेल्या या कलंदर साहित्यिकाने स्वकर्तृत्वाने आपले नाव साहित्यक्षेत्रात अजरामर केले.  वाट्याला आलेल्या प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करीत दु:खांचे पहाड उचलत, शोषित पीडितांचे जगणे साहित्यात अधोरेखित केले.  शाहिरी, कथा – कादंबरी, वगनाट्य, प्रवासवर्णन, पटकथा इत्यादी साहित्यप्रकारात लेखन करून माणसातील माणूसपण जपले.  सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून त्याच्या जीवनातील व्यथा, वेदना लेखनातून मोकळ्या केल्या.  दबलेल्या, पिळलेल्या नागवलेल्या माणसातला माणूस  पुढे आणला अन अन्याय, अत्याचार कारणाऱ्याचा बुरखा फाडला.  प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत निगर्वीपणे जगला – जागवला.

तत्कालीन समाजमनाची स्पंदने अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीतून अविष्कृत होतात.  कल्पनाविलासापासून दूर असलेले अण्णा भाऊंचे कादंबरी लेखन माणसाचे वास्तव जगणे सांगून जाते.  उपेक्षित आणि प्रस्थापितांचा संघर्ष हा अण्णा भाऊंच्या लेखणीची शाई सदैव संवेदनशीलाच राहिली आहे.  याचे चित्रण ‘रानगंगा’ , ‘पाझर’, ‘अलगुज’, ‘मास्तर’, ‘तारा’, ‘वारणेचा वाघ’, ‘मूर्ती ‘, ‘अग्निदिव्य’ आणि ‘मयूरा’ या कादंबऱ्यांच्या  दुसऱ्या खंडातून  दिसून येते.  समकालीन जीवनदर्शन व मूल्यात्मक जगण हा या कादंबऱ्यांचा विशेष होय.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अण्णा भाऊ साठे निवडक वाङ्मय : कादंबरी खंड – 2”

Your email address will not be published. Required fields are marked *