Description
भगवद्गीता खरोखरच केवळ आध्यात्मिक ग्रंथ आहे की, त्यामागे काही एखादे उद्दिष्ट दडलेले आहे?
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या प्रखर आणि तार्किक शैलीत भगवद्गीतेचे जे विश्लेषण केलेले आहे, ते कोणत्याही वाचकाला अंतर्मुख करायला लावणारे आहे. हे पुस्तक केवळ एका धार्मिक ग्रंथाची समीक्षा नाही, तर ती बुद्धधम्माच्या क्रांतीनंतर झालेल्या प्रतिक्रांती मागील सामाजिक आणि राजकीय इतिहासाचा उलगडा करणारा एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. डॉ. आंबेडकर या पुस्तकातून मांडतात की, भगवद्गीतेचा जन्म हा बौद्ध धम्माच्या समतावादी विचारांना छेद देऊन चारुर्वर्ण्य व्यवस्थेला पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी झाला.
श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करताना सांगितलेले तत्त्वज्ञान हे अहिंसेपेक्षा कर्तव्याच्या नावाखाली हिंसेचे समर्थन कसे करते आणि जातिव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी भगवद्गीतेचा कसा पद्धतशीर वापर केला गेला, याचे अत्यंत सूक्ष्म आणि तर्कशुद्ध विवेचन या पानांमध्ये वाचायला मिळते. इतिहासाकडे पाहण्याची एक सत्यशोधक दृष्टी देणारे हे लिखाण पारंपरिक समजुतींना धक्का देते आणि सत्य शोधण्याची जिद्द निर्माण करते. भारतीय समाजव्यवस्थेचा पाया आणि त्यातील विसंगती समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक जिज्ञासू वाचकाने वाचावेच असे हे क्रांतिकारी पुस्तक आहे.

Reviews
There are no reviews yet.