Description
- जवाहरलाल नेहरू व आझाद यांनी क्रिप्सच्या पुढे ३० मार्चला काँग्रेसतर्फे योजना मांडली.
- ब्रिटनने भारताला संपूर्ण स्वातंत्र्य देण्याची घोषणा ताबडतोब करावी.
- भारतात आपली राज्यघटना तयार करण्यासाठी घटना परिषद भरविण्याचा हक्क मान्य केला पाहिजे.
- ही परिषद सार्वत्रिक मतदानाच्या आधाराने निवडण्यात यावी आणि
- भारतीय केंद्र सरकार ताबडतोब निर्माण करण्याचे जाहीर करावे. ही योजना ब्रिटनने स्वीकारली तर भारत ब्रिटनला युद्ध जिंकण्यास मदत करील. क्रिप्सनी उलट अशी योजना नेहरू व आझाद यांच्यापुढे मांडली की, (१) ब्रिटन भारताला युद्धसमाप्तीनंतर वसाहतीचे स्वराज्य देईल. (२) भारताने, घटना समिती १९३५ च्या कायद्यातील मतदानाच्या आधारे निवडावी आणि (३) राज्यघटना युद्धसमाप्तीनंतर तयार करावी. नेहरू- आझादांनी क्रिप्सची योजना नाकारली. ३० मार्चला रात्री क्रिप्सनी रेडिओवरून भाषण करून आपल्या योजना, भारताने अजून विचार करून स्वीकाराव्या, अशी भारतीयांना विनंती केली.
एकत्रित १२ पुस्तकांचा संच खरेदी करावा, एक एक पुस्तक उपलब्ध होत नाही.

Reviews
There are no reviews yet.