Description
”कसली कसली तणनाशकं मारत्याती. ते मारलेल्या जमिनीवरन नुसतं चाललं तर अंगाचा आगडोंब हुतूय, मग जमिनीनं ते कसं सोसायचं. जमिनीतली किडामुंगी सगळं मरून जातंय. एवढा तिच्यावर अत्याचार केल्यावर ती काशी पिकणार. काजळाच्या वडीसारखं शिवार आता ख़रूज आलेल्या माणसासारखं दिसाय लागलंय. ढेकूळ तोंडात टाकला तर खराट घोट लागतूय. सगळ्या वावरावर पांढराधोट मिठाचा थर तवंग आल्यासारखा दिसतूय. अजून एखाद वरीस कसं तरी शिवार दम काढील; पण त्येच्या म्होर ह्येच्यात काय पीक यील असं मला वाटत न्हाई. पिकायचं बंद झालं, की मग बसा बोंबलत. ईख खाऊन मरा, न्हाई तर झोळ्या घेऊन भीक मागत फिरा. आपल्या डोळ्यादेखत शिवाराचं झालेलं हे वाटूळं बघण्यापरास चाटशिरी मराण आल्यालं चांगलं.”
एका बाजूला रानशिवाराशी जडलेलं श्रद्धाविश्व आणि दुसऱ्या बाजूला आधुनिक विकासाच्या नावाखाली सुरू असणाऱ्या बदलांमुळे लयाला चाललेलं रानवैभव अशा कात्रीत सापडलेला प्रत्येक शेतकरी अशी मरणाची भाषा बोलतो. ‘शिवार’ मधले अण्णा-आप्पाही त्याला अपवाद नाहीत…
शेतकऱ्याला बागाईतदार अशी ओळख देणाऱ्या उसशेतीने निर्माण केलेल्या प्रश्नांचा चौफेर वेध घेणारी आणि या प्रश्नांच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्याची हतबलता मांडणारी ही कहाणी. शेतीच्या भांडवलीकरणातून झालेल्या शेतकऱ्याच्या कोंडीचा ग्रामजीवनावरील दूरगामी परिमाण समजून घेण्यासाठी वाचलीच पाहिजे अशी कादंबरी.
Reviews
There are no reviews yet.