Description
21 ऑक्टोबर 1943 ला भारताच्या स्वातंत्र संग्रामाला एक नवे परिमाण लाभले. याच दिवशी भारतापासून शेकडो मैल अंतरावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी परकी सत्तेविरुद्ध युद्ध पुकारले. ‘छोडो भारत’ चळवळीने सारा देश पेटून उठला असतानाच आपल्या पत्रास हजार सैन्यासह नेताजी ब्रह्मदेशाहून भारताच्या सीमेकडे धीमेपणे कूच करत होते. आग्नेय आशियातील महाबलाढ्य ब्रिटिश साम्राज्याला आव्हान देण्याचे धाडस आझाद हिंद फौजेने केले. तिच्या अथक शौर्याची ही स्फूर्तिदायी कथा.
या पुस्तकाचे लेखक एस. ए. अय्यर (1898-1980) यांनी 1918 साली मुंबईत वार्ताहर म्हणून काम सुरू केले आणि 1941 साली थायलंड येथे रॉयटरचे ते विशेष वृत्त प्रतिनिधी नेमले गेले. बैंकॉक येथे भारतीय स्वातंत्र्य सेनेत ते 1942 साली दाखल झाले आणि आझाद हिंद सरकारच्या अस्थायी शासनात माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री झाले. ते 16, 17 ऑगस्ट 1945 क्या नेताजींच्या शेवटच्या ज्ञात विमानयात्रेत सिंगापूरपासून सायगावपर्यंत त्यांच्या सोबत होते. त्यांनी जपानला भेट दिली आणि नेताजींच्या नाहीसे होण्याचे इतिवृत्त जवाहरलाल नेहरूंना सादर केले. नेताजींविषयी त्यांनी ‘अन टू हिम अ विटनेस’ हे पुस्तक लिहिलेले आहे. भारत सरकारच्या विविध विभागांत त्यांनी महत्त्वाची पदे भुषविली आहेत.
Reviews
There are no reviews yet.