Description
तानाजी धरणे यांची “हेलपाटा” ही ग्रामीण कादंबरी आहे. स्वभावाने प्रेमळ, सोज्वळ, मितभाषी या लेखकाने माणसाचे जग न्याहाळीत माणसं जोडण्याचं काम केलं. त्यांच्या कादंबरीला आजूबाजूचे जनसमुदाय, शेती, माती आणि कष्टकरी माणसं, नाती-गोती, कुटुंब समाज यांच्याशी जोडलेली नाळ या कादंबरीतून अविरतपणे येते. जेमतेम परिस्थितीत जगणाऱ्याच्या जीवनात अनेक हेलपाटे येतात, चढउतार येतात. तानाजी तरूण असताना दारिद्र्यापायी पोळून गेलेला. भाकरीसाठी पंचवीस वर्ष भटकंती करणारं हे कुटुंब वणवण करत गावोगावी फिरत होतं. पोटाची खळगी भरण्यासाठी करावी लागणारी धडपड हे कुटुंब करत होतं. तानाजी आंब्याची, भाजीची टोपली डोक्यावर घेऊन विकायचा. चार पैसे मिळवायचा. त्यातून कसबसे शिक्षण घ्यायचा. दारिद्र्याचे चटके सहन करीत संघर्षातून उपासतापास काढत हेलपाटे खात वर चढत होता.
हे अनुभव मन हेलावून सोडतात. याच खाचखळग्यांनी वाट्याला आलेल्या जीवनातील आठवणी त्यांना आजदेखील रडवतात. हे जीवन अनेकांच्या वाट्याला अजूनही आहे. हे स्वकथन समाज व्यवस्थेला सामाजिक समतेचा नकळत आग्रह धरून जाते. त्याला समष्टीचे रूप येते. कादंबरीच्या प्रत्येक ओळीत टपकणाऱ्या व्यथा काळीज पिळवटून काढतात. कादंबरीतील भाषा ग्रामीण व्यवस्थेतील हुबेहुब चित्रण करणारी आहे. तिच्यातला जीवंतपणा पानोपानी जाणवतो. तानाजी धरणे यांची ‘हेलपाटा’ ही कादंबरी लोकप्रियतेचे शिखर गाठेल.
Reviews
There are no reviews yet.