Description
एकूण लोकसंख्येच्या पन्नास टक्के लोकसंख्या – तीन अब्ज लोक – दारिद्र्य रेषेखाली आहे आणि जगातल्या गरीब लोकांपैकी सत्तर टक्के ग्रामीण भागात राहतात. जगातून गरिबी दूर करण्याच्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नाचा ‘उद्दिष्ट तीन अब्ज’ हे पुस्तक वेध घेते.
भारतात सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या = पंचाहत्तर कोटी आहे. भारतातील अनुभवांच्या आधारे डॉ. कलाम यांनी ‘पुरा’ – प्रोव्हीजन ऑफ़ अर्बन एमेनिटीज इन रूरल एरियाज – शहरी भागातल्या सोयी सुविधा ग्रामीण जनतेला पुरवणे – या शाश्वत आणि सर्व समावेशक विकास प्रणालीची शिफारस केली.
अनुदानापेक्षाही उद्योजकता आणि सामाजिक सहभाग यातून ग्रामीण गरिबांचा उद्धार करणे, हे ‘पुरा’ चे ध्येय आहे. आपल्या म्हणण्याला पुष्टी देण्यासाठी डॉ. कलाम यांनी ज्यांच्यात उद्योजकीय बाणा आहे आणि वेगळे काहीतरी करून दाखवण्याची ज्वलंत इच्छाशक्ती आहे , तसेच ज्यांनी ग्रामीण क्षमतांचा पुरेपूर उपयोग करून घेतला आहे, अशा भारतातील आणि जगातील अनेक व्यक्तींची आणि संस्थांची उदाहरणे दिली आहेत.
- फाबिओ लुई डे ऑलिव्हेरा रोझाने पाल्मारेस या ब्राझीलमधील ग्रामीण जिल्ह्याचे रूपच पालटून टाकले. पाणी आणि वीजपुरवठा, तसेच चांगल्या कृषी पढतींमुळे संपन्नता आली आणि खेड़्यांकडून शहरांकडे जाणारा ओघ थांबला.
- महाराष्ट्र राज्यात पुण्याच्या वेशीवर ४३० एकर क्षेत्रावर १२३ खेडेगावांचा समावेश असलेला भूखंड मगर परिवाराच्या मालकीचा होता. १९९० साली सगळ्यांनी एकत्रित होऊन स्थापन केलेल्या ‘मगरपट्टा’ शहरात ३५,००० रहिवासी असून ६५,००० लोक काम करतात आणि आय. टी. पार्क विकसित केले गेले आहे.
‘उद्दिष्ट तीन अब्ज ‘ डॉ. कलाम यांनी अत्यंत तेजस्वीपणे तयार केलेल्या जागतिक शाश्वत विकास प्रणाली, अर्थात ‘पुरा’ ची कथा आहे. तीन अब्ज सक्षम, उत्पादक आणि निरोगी नागरिक निर्माण करणे आणि तीन अब्ज स्मितहास्ये फुलवणे या कामात प्रत्येक व्यक्ती किंवा संस्था योगदान देऊ शकेल.
Reviews
There are no reviews yet.