Description
कित्येक सत्ता उगवल्या आणि नष्ट झाल्या. लुटारूंनी लुटल्या, लोभींनी भ्रष्ट केल्या. बदमाशांनी छापे घातले. फितुरांनी फितुरी केली. मित्र शत्रू बनले. शत्रू मित्र. सत्तेसाठी आप्तेष्टांचा वध आणि शत्रूंशी विवाहदेखील. कंपन्यांनी वसाहती लुटल्या आणि साम्राज्ये उभारली. परंतु इतिहासाची वाटचाल अप्रत्याशित असते. एका सोनेरी सकाळी अमानुषतेच्या आणि जुलमाच्या या भिंती पडल्या. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. २६ जानेवारी १९५० ला राज्यघटना अमलात आली. स्वतंत्र भारताने स्वातंत्र्य बंधुता आणि समानता ही मूल्ये स्वीकारली. लॉर्ड एक्टन या ब्रिटिश इतिहासकाराच्या मते, ‘इतिहास म्हणजे मानवी स्वातंत्र्याची कथा. साम्राज्य उभारणे हा इतिहासातील सर्वश्रेष्ठ क्षण नव्हे, तर मानवी स्वातंत्र्याची गुढी उभारणे हा इतिहासातील सर्वश्रेष्ठ क्षण’ आधुनिक भारताच्या इतिहासातल्या या सर्व क्षणांची क्रमवार मांडणी करणारे हे पुस्तक.

Reviews
There are no reviews yet.