Description
डॉ. आंबेडकरांच्या दलित जाहिरनाम्यातून आंबेडकरवाद उफाळून येतो. जसा कम्युनिस्ट जाहिरनाम्यातून मार्क्सवाद आणि हिंद स्वराजमधून गांधीवाद उफाळलेला दिसतो. साउथबरो आयोगासमोरच्या डॉ. आंबेडकरांच्या भाषणाचे वृत्तांत, त्यांच्या सायमन कमिशन-गोलमेज परिषद-हिंदू परिषद- पुणे करार- व्हाइसरॉय कौन्सिलची कागदपत्रे यांमधून आंबेडकरवाद समजून सांगण्यात आला आहे. जात/ वर्ण / जमाती / वंश या भेदभावांच्या जखमा असणाऱ्या प्रत्येक समाजासाठी आंबेडकरवाद हे भविष्य आहे. त्याची मात्रा सर्वांना लागू पडते.
आंबेडकरवाद उत्तर भारतातील त्या पिकासारखा आहे जे पावसाळ्यात जलमय भागात उगवत. ते पीक, ज्याची कोणीही लागवड करत नाही. जे तन्नी / तन्ना म्हणून ओळखलं जातं; जे स्वत:चं पाणथळ भाग जसे की गावाबाहेरील तलाव ज्यांना ताल तल्लैया असं म्हणतात, तिथे उगवून येतं. पावसासोबत जसं पाणी वाढतं तसं हे पिकसुद्धा वधू लागतं. पाणी कधीच तन्नी पिकाला बुडवू शकत नाही. एकदा ते पिकून तयार झालं की गरीब स्त्रिया कमरेभर पाण्यात शिरून तन्नी पिकाच्या बिया काढतात.
आंबेडकरवाद ही जिवंत विचारसरणी आहे. आंबेडकरांच्या वेळी शाळेपासून विद्यापीठापर्यंत नि:शुल्क शिक्षण मिळणं हा आंबेडकरवाद होता. आज आपल्या काळात दलितांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळणं हा आंबेडकरवाद आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये दलितांचं अस्तित्व असणं हा आपल्या काळातला आंबेडकरवाद आहे. राजकीय वर्चस्व हा दलित वर्चस्वाचा एकमेव मार्ग नाही. सांपत्तिक सामर्थ्य हा सुद्धा दलित वर्चस्वाचा मार्ग आहे. दलित जनसमुदाय हासुद्धा दलित वर्चस्वाचा मार्ग आहे, म्हणून मध्यमवर्गीय दलितांच्या घरी शैंपेन आणि वाइनसुद्धा बघावयास मिळते.
आंबेडकरवादाचा नेमका अर्थ काय, ते हे पुस्तक विशद करते.
Reviews
There are no reviews yet.