Description
”विचार, तत्वज्ञान आणि मूल्ये हि निरंतर चालणारी प्रकिया असते. या सर्व पार्श्वभूमीवर डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांची मांडणी आचरणाच्या भूमिकेतून डॉ. मिलिंद कसबे यांनी या ग्रंथात केली आहे. आंबेडकरवादी विचार आणि खुद्द डॉ. आंबेडकर यांचे रूपांतर प्रतीकांत आणि भक्तिभावात करण्याची हि जणू काही चढाओढ सुरु आहे. या बरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणाऐवजी श्रध्येकडे अधिक झुकवण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. अर्थात ,याचा खूप तोटा होणार आहे. माणसाचं जग बदलण्यासाठी प्रतिकांऐवजी विचारच क्रांतिकारी भूमिका बजावत असतात.
आंबेडकरी विचार म्हणजे नेमके काय, त्यांचे आचरणात अस्तित्त्व असणे म्हणजे काय,विचारांचा विधायक परिणाम घडवणे म्हणजे काय, आणि सद्यस्थिती काय, या साऱ्यांचा डॉ. कसबे यांनी तटस्थ वृत्तीने आणि भक्तिभाव, श्रद्धा यांच्या पलीकडे जाऊन घेतलेला वेध म्हणजे हा छोटेखानी ग्रंथ आहे. डॉ. आंबेडकर यांचा विचार आचरणात आणल्याशिवाय बदल घडवता येत नाही आणि त्यासाठी लढताही येत नाही. आजच्या आणि उद्याच्या पिढीसाठी हे लेखन खूपच उपयुक्त आहे
Reviews
There are no reviews yet.