Description
मराठा – कुणबी समाज हा महाराष्ट्रात संख्येने सर्वात मोठा समाज आहे. परंतु जवळपास ९५ टक्के समाज खेड्यांत राहतो. शेतात राबतो, शिक्षणाचा अभाव, अंधश्रद्धांचा प्रभाव आणि रूढ़ी परंपरांचा दबाव यामुळे त्याचा ‘ स्वभाव ‘ विशिष्ट प्रकारचा बनलेला आहे .
दुरुपयोग – कोणताही मोठा समाज जागृत नसला आणि अडाणी असला तर कुटिल, क्रूर आणि स्वार्थी लोक त्याची दिशाभूल करतात. त्याचा दुरुपयोग करतात. ते अशा समाजात आपले ‘ हस्तक ‘ पेरतात. त्यांच्या मदतीने जातीय तणाव वाढवितात. इतर अल्पसंख्य समाजावर अन्याय – अत्याचार करतात. ‘ देशापेक्षा देव मोठा ‘ असा चुकीचा समज करून देतात. ‘ देवभक्ती आणि धर्मभक्ती म्हणजेच देशभक्ती होय,’ असा गैरसमज पसरवितात. दूरदर्शन, सिनेमा, वर्तमानपत्रे वगैरे प्रसारमाध्यमे त्यांचीच असल्यामुळे त्यांना मदत करतात. देवा – धर्माच्या नावाखाली जातीय दंगली घडवून आणतात. दंगलींमुळे राष्ट्रीय संपत्ती नष्ट होते. भ्रष्टाचार, काळाबाजार वाढतो. महागाई वाढते, महागाई वाढणे म्हणजे गरीबी वाढणे होय.
- भारतातील प्रत्येक समाज सुखी, तर भारत सुखी म्हणून आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी उपाय कोणते ?
- उत्तम संतती, तर कुटुंब, समाज आणि राष्ट्र सुरक्षित.
- संतती कशी घडवावी ? कशी शिकवावी ?
- अभ्यास कसा करावा ? परीक्षेची तयारी कशी करावी ?
- पेपर कसा सोडवावा ? मेरीटचे गुपित कोणते ?
- शेतीपेक्षा नोकरीच का महत्त्वाची ?
- उद्योग आणि व्यापार कसा वाढवावा ?
- देव कुठे आहे ?
- गरीबी कशी वाढते ? कोण वाढवितात ?
- आपले शत्रू कोण ? मित्र कोण ?
- समाजाची ‘ बिगर राजकीय मुळे’ कशी मजबूत करावीत ?
- आपले संघटन कसे उभारावे ?
Reviews
There are no reviews yet.