Description
असे म्हणतात की शिवरायांना घडवताना जिजाऊ त्यांना रामायण आणि महाभारतातल्या गोष्टी सांगत असत. या प्रेरणादायी गोष्टीतूनच शिवरायांचे स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी मनोबल निर्माण झाले. आज आपल्याला व पुढच्या पिढींना कर्तृत्व करण्याचे मनोबल निर्माण करण्यासाठी शिवरायांच्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. पारंपारिक राजघराण्यात किंवा राजाच्या पोटी जन्माला न आलेल्या व्यक्तीने स्वराज्याची निर्मिती करून दाखवली ही शिवरायांच्या जीवनाची प्रचंड प्रेरणादायी गोष्ट आहे.
स्वराज्य निर्मितीच्या यशापर्यंत पोहोचताना अपयशही आले होते काय ? हेही माहीती असणे गरजेचे आहे. शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात फक्त तलवारीने लढाया केल्या एवढेच माहीत असणे गरजेचे नसून त्यांचे कौटुंबिक जीवन ,रयतेप्रती असणारा जिव्हाळा आणि प्रेम, त्यावेळची राजकीय समीकरणे माहीत असणे तितकेच महत्त्वाचे आहे. सनावळींचा अतिरेक न करता आटोपशीर शब्दात शिवरायांची गोष्ट सांगण्याचे कौशल्य लेखकाने केलेले आहे. वस्तुस्थितीदर्शक गोष्ट समजण्यासाठी पुस्तकात आठ रंगीत नकाशेही देण्यात आलेले आहेत.
आजच्या तंत्रज्ञानाच्या 21व्या शतकातही ख-याखु-या प्रेरणेसाठी प्रत्येक व्यक्तीने वाचले पाहिजे असे पुस्तक सादर झाले आहे.
Reviews
There are no reviews yet.