Description
“सर्वसमावेशकता हे या देशाचं वैशिष्ट्य आहे. देशातील सामान्य माणसावर माझा विश्वास आहे. हा सर्वसामान्य भारतीय माणूस भारतातील सर्व राजकारण्यांपेक्षा खूपच शहाणा आणि समजूतदार आहे. योग्य वेळी योग्य निर्णय तो घेतो. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जनतेचं एक सामुदायिक शहाणपण प्रत्ययाला येतं. हेच शहाणपण भारतीय लोकशाहीचा कणा आहे. त्याच्या भरवशावर या देशाचं भवितव्य सुरक्षित आहे. साया भारतभर त्याच्या या प्रगल्भ जाणतेपणाचा मी आपल्या सहा दशकांच्या सार्वजनिक जीवनात काम करताना वारंवार अनुभव घेतला आहे. या जनतेचा विश्वास मला पंचावन्न वर्ष लाभला, यापेक्षा अधिक काय असू शकतं ?”
गेली सहा दशकं देशाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण सहभाग असणाऱ्या नेत्यानं घेतलेला आपल्या राजकीय वाटचालीचा विश्लेषक वेध
Reviews
There are no reviews yet.