Description
” मुळात कोणत्याच भाषेत शुद्ध आणि अशुद्ध असे काहीच नसते. पुणेरी, सातारी, कोल्हापुरी, वऱ्हाडी, कोकणी, खानदेशी, माणदेशी, मराठवाडी, मालवणी, आगरी, गंगेरी आशा अनेक रूपांत मराठी भाषा बोलली जाते. प्रादेशिकतेमुळे उच्चारात फरक पडतो म्हणूनच मराठीत उच्चारानुसार लेखन करणे सोयीस ठरत नाही. यासाठी परंपरा, व्युत्पत्ती, व्याकरण, उपयुक्तता आणि चालू काळातील प्रचार आणि प्रसार यांचा शुद्धलेखन ठरविण्यासाठी विचार केला जावा अशी शिफारस विद्वज्जनांनी केली आहे.
फार काय सांगावे ! इंग्रजी आणि जर्मन भाषांप्रमाणे ‘लेखन करताना लेखनाचे नियम पाळावेत तर बोलताना बोलण्याच्या शिस्तीने बोलावे.’ म्हणजे नि:संशय भाषेचा विकास होईल; अन तिला पूर्णत्वाची स्थिरताही येईल. ”

Reviews
There are no reviews yet.