प्रवास तुझा नि माझा …

110.00

1 in stock

पुस्तकाचे नाव प्रवास तुझा नि माझा …
लेखक निर्मला गंगाधर कवितके
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ७९
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ६० ग्रॅम

Description

”विद्येविना मती गेली” या महात्मा फुले यांच्या शेतकऱ्यांचा असूड पुस्तकातील ओळींची ” प्रवास तुझा नि माझा” हे आत्मकथन वाचताना पदोपदी जाणीव होते.  लेखिका तिच्या जीवनातील पहिल्या मोठ्या आजारातून सही सलामत बाहेर पड़ते त्यावेळी सोबतीला असणारा भावी नवरा! खरं तर येथूनच सोबत असणारे गंगाधर भाऊजी आपले जीवनसाथी होणार याची लेखिकेला चाहुल लागते आणि सुरु होतो दोघांचा जीवन प्रवास ! लेखिका आणि तिचा पती यांच्या जीवनावर महात्मा फुले व सावित्री माईंच्या जीवनकार्याचा प्रचंड असा प्रभाव असल्याचे पदोपदी जाणवत राहते. लेखिकेला नववीतच तिचा शिक्षणप्रवास संपतो की, काय अशी शक्यता वाटत असताना तिचा भावी नवरा तिला परत शिक्षणाच्या प्रवाहात घेऊन जातो. फ़क्त लेखिकेलाच नाही तर भविष्यात त्यांची मुले, सुना, यांना सुद्धा शिक्षण घ्यायला प्रवृत्त करतात, हा खूप मोठा विचार ते कृतीतून आपल्यासमोर मांडतात. 

लेखिकेवर दरवेळी येणारी संकटे आणि त्या संकटांना पुरून उरणारा त्यांचा जीवनसाथी, प्रत्येक वेळी संकटावर मात करतो आणि  जीवनप्रवास सुखकर करतो. दोघेही कायमस्वरूपी एकमेकांना सांभाळून घेत प्रवास करत असताना प्रवासात आलेल्या सुखद  व  दु:खद घटनांचा स्वीकार करतात.  लेखिकेला वारंवार मोठ्या आजार, अपघातांना तोंड देताना तिला झालेल्या वेदना नकळत वाचकांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या केल्याशिवाय राहत नाहीत. अपघातातील तिच्या अंगावर पडणारी रक्ताची धार चुकविण्याचा प्रयत्न करूनसुद्धा तिला चुकवता येत नाही, असा अंगावर शहारे निर्माण करणारा प्रसंग अक्षरश: डोळ्यासमोर उभी लेखिका यशस्वी झाली आहे. पतीवर बेतलेला जीवघेणा प्रसंग, त्यातून त्यांच्या वर्तणुकीतील बदल सर्वांना कसा त्रासदायक ठरतो, नव्हे तो जीवनाच्या शेवट प्रवासाकडे नेण्यास कारणीभूत ठरतो. अख्खं कुटुंब त्यांना या आजारातून बाहेर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असतात, त्यात थोडेफार यशही पदरी पड़ते  परंतु वेळ ही सर्वांचीच ठरलेली असते.  यातच लेखिकेला एक प्रश्न पडतो, एवढी आमची चांगली जोड़ी. ईश्वर दत्त देणगी! मग असं का ? दीर्घ सहवास का नाही मला मिळाला ? यावर त्यांना मिळालेलं उत्तर देखील भावनिक आणि वैचारिक आहे.  ‘अमृताचा थेंब असतो, तांब्या किंवा चरवी नसते. किती जगले यापेक्षा कसे जगले हे महत्त्वाचे!’ अशा सुंदर, वैचारिक भावनाही ”प्रवास तुझा नि माझा” हे आत्मकथन देत राहतं आणि वाचकांना प्रगल्भ  करत जातं.  खरंतर वाचकांना याहून अधिक वेगळे तरी काय हवे असते?  

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्रवास तुझा नि माझा …”

Your email address will not be published. Required fields are marked *