Description
1857 च्या स्वातंत्र्य संग्रामापूर्वीच उमाजीराजेंनी इंग्रजांविरोधात सशस्त्र क्रांतीची सुरवात केली होती. म्हणूनच त्यांना “आद्यक्रांतिवीर” म्हटले जाते. शिक्षणाचे महत्त्व ओळखून कैदेत असताना उमाजीराजेंनी शिक्षण घेतले होते, हे त्या काळातील एक प्रेरणादायी आणि दुर्मिळ उदाहरण आहे. हजारो रामोशी लोकांना आणि समाजातील वेगवेगळ्या घटकांना एकत्र करून उमाजीराजेंनी इंग्रजांविरोधात लढा उभा केला होता, परंतु एवढा मोठा पराक्रम करुनसुद्धा दुर्दैवाने देशाच्या इतिहासात त्यांना पाहिजे तेवढे महत्त्व दिले गेले नाही. आधुनिक भारतात सर्वप्रथम अखंड हिंदुस्थानचा उल्लेख करणाऱ्या उमाजीराजेंना एका थोड्याशा क्षेत्राशी निगडीत ठेवण्यात आले. उमाजीराजेंचा इंग्रजांविरोधातील 10 वर्षांपेक्षा जास्त एवढा प्रदीर्घ काळ चाललेला संघर्ष देशाच्या विस्मरणात गेला, परंतु किमान आता तरी या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उमाजीराजेंचे थोर कार्य देशवासियांसमोर जावे, ही अपेक्षा आहे. उमाजीराजेंचे चरित्र संपूर्ण भारतीयांना प्रेरित करेल, हा विश्वास आहे.
Reviews
There are no reviews yet.