Description
देशातील धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक राजकारणाचा वेध घेणारा लेखसंग्रह
शंभर वर्षांच्या अथक, एकाकी, समर्पित, कष्टप्रद, काही काळ यातनामय वाटचालीनंतर संघ आज निर्विवादपणे सत्तेत केंद्रस्थानी उभा आहे. संघाने स्पष्टपणे सांगितलय आमचा फ़क्त एककलमी कार्यक्रम आहे, ‘ हिंदूंचाच हिंदुस्थान ‘ म्हणजे हे हिंदुराष्ट्र आहे. भारत हे संघराज्य नाही ते एक राष्ट्र आहे आणि हा देश एकाधिकारशाही मानतो. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर राज्यघटना बनवत असताना ऑर्गनायझरने त्याला कडवा विरोध केलाय. या देशाची घटना मनुस्मृतीवर आधारित हावी म्हणून सांगितले.
राजकारण करताना ”वारांगनेव नृपनीती अनेकरूपा” हा मंत्र बरोबर ठेवा आणि मुखवटे घालून राजकारणात वाटचाल करा. हा आदेश संघाने राजकारणात पाठवलेल्या स्वयंसेवकांना दिलाय. पुरोगामी परिवर्तनवादी चळवळ ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ म्हणून त्याकडे उपेक्षेने खरंतर उपहासाने पाहत उभी होती. आज ही चळवळ भांबावलेल्या खरंतर भेदरलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे खरी गरज आहे. यातून बाहर येऊन संघाची शक्तीस्थाने आणि मर्मस्थाने जाणून घेण्याची व पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीने केलेले ‘हिमालयीन ब्लंडर’ समजावून घेत रणनीती ठरविण्याची. या व अशा प्रश्नांचा मागोवा घेत अस्वस्थ मनस्थितीत गेल्या दहा वर्षात दत्तप्रसाद दाभोळकर यांनी लिहिलेल्या काही प्रमुख लेखांचे हे संकलन
आज आपणासमोर असलेल्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक राजकारणाचा चक्रव्यूह समजावून घेण्यासाठी हे पुस्तक वाचून संग्रही ठेवले पाहिजे.

Reviews
There are no reviews yet.