Description
ए कोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जन्मलेल्या एखाद्या भारतीय स्त्रीने आपल्या आयुष्यात किती भूमिका वठवाव्यात? मुलगी, प्रेयसी, पत्नी, आई अशी सारी कौटुंबिक नाती तिने जपलीच; पण त्याचबरोबर स्वातंत्र्यलढ्यातील रणरागिणी, लोकप्रिय वक्ता, काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवणारी पहिल्या रांगेतील राजकीय नेता, श्रेष्ठ कवयित्री, नवाबांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांशी नाते जोडणारी संवादपटू, गांधीजी असोत की नेहरू सर्वांच्या खोड्या काढणारी ‘भारताची खोडकर मुलगी’, स्त्रीस्वातंत्र्याचा आदर्श… अशा कितीतरी भूमिका सरोजिनी नायडू जगल्या. त्यांनी जीवनावर, कवितेवर जीवापाड प्रेम केलं. त्यांचं सारं आयुष्य हीच एक रसरशीत, धगधगती क्रांतिकारी कविता होती. “माझ्या मृत्यूनंतर माझ्या स्मारकाच्या चिऱ्यावर ‘भारतीय युवकांवर हिचे प्रेम होते’ अशी ओळ कोरा,” असे सांगणारी ही चिरतरुण हृदयाची ‘भारताची गानकोकीळा’.
विसाव्या शतकातील भारताला स्वतंत्र स्त्री काय असते, याची ओळख करून देणाऱ्या या दीपशिखेचे चरित्र आपल्याला वाचायलाच हवं.
‘गांधी-१५०’च्या निमित्ताने युवा पिढीला नवभारताच्या निर्मात्यांची तोंडओळख करून देणाऱ्या ‘गांधीजन चरित्रमाला मधील एक महत्त्वाचं पुष्प.
Reviews
There are no reviews yet.