Description
रामायणातील बऱ्याच कथा व घटना ‘अरबी योधा’ ‘मदन कामरा’ व ‘पंचतंत्र’ नामक पुस्तकातील कथानकासमान आहेत. त्या आपणाला समजण्या पलीकडच्या आहेत. यामुळे आपण असा निष्कर्ष काढू शकतो की, रामायण हे वास्तवाला धरून नाही. कुणालाही असे समजून येईल की रामायणवाले केवळ काल्पनिक स्वर्ग व ईश्वर यांचा संदर्भ देऊन अज्ञानी भोळ्याभाबड्या समाजाला आपल्या स्वार्थासाठी मूर्ख बनवीत आहेत. रामायणातील तत्त्वज्ञान हे निरर्थक व अनावश्यक आहे. यातील प्रसंग, घटना, त्या पात्रांतील सद्गुण, करुणा आणि आशीर्वाद इत्यादी गोष्टी मनुष्याच्या विचारशक्तीला न पटणाऱ्या आहेत. रामायणातील राम स्वर्गातून पृथ्वीवर उतरला व तो ईश्वररुप आहे असे समजावे असा आग्रह आहे. वाल्मीकीने स्थाष्टपणे नमूद केले आहे की, राम विश्वासघातकी, कपटी, लालची, दिखाऊ वृत्तीचा, मांस्तहारी आणि निरपराध्यांवर क्रूरपणे बाण मारणारा आहे.

Reviews
There are no reviews yet.