Description
अनादी काळापासून या भारत (जम्बुद्विप) या देशात वैदिक (ब्राह्मणी) धर्म आणि बौद्ध धम्माचा अविरत संघर्ष सुरू आहे. कालचा वैदिक म्हणजे आजचा ब्राह्मणी धर्म जो आज हिंदू धर्म या नावाने ओळखला जातो. हा धर्म मानवद्रोही या नावाने ओळखला जातो. हा धर्म मानवद्रोही असल्यामुळेच तथागतांनी या विकृत विचारांविरूद्ध बौद्ध धम्माची स्थापना करून मानवाचे हित साधले. तोच वारसा सत्यशोधक जोतिबा फुले यांनी ‘सत्य शोधक’ चळवळीद्वारे चालवून वैदिकशाही म्हणजेच ब्राह्मणशाही पराभूत केली. तथागत व जोतिबांना आदर्श मानून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोट्यावधी दलित, पिडीत, शोषित बहुजनांना धम्मक्रांती करून बुद्धाचा मार्ग दाखवला. म्हणजे हिंदू धर्म नाकारला आणि आपली प्रतिज्ञा खरी करून दाखवली. “मी हिंदू धर्मात जन्माला आलो तरी, मी हिंदू धर्मात मरणार नाही.”

Reviews
There are no reviews yet.