Description
सावित्रीबाईंनी जोतिरावांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘दुसरी चिंतेची बाब अशी की सावरकरांना लुटावे, त्यांची नाके कापवीत, अशी दुष्ट कर्मे या भागात घडत आहेत. त्यातच मोठे मोठे दरोडे पडत आहेत. हे श्रवण करून कलेक्टर येथे आला. त्याने मसलत केली. त्याने गोरे सार्जंट पाठवून बंदोबस्त बसविला. ५० सत्यशोधक पकडून नेले. त्याने मला बोलविले तेव्हा मी उत्तर केले की, आमच्या लोकांवर आळ व कुंभाड़ घेऊन कैदेत ठेवले ते सोडा. कलेक्टर न्यायी आहे. तो गोऱ्या फौजदारास रागे भरून बोलला की, पाटील का दरोडे घालतात? त्यांना सोडून दे. कलेक्टर दुष्काळ पाहून कष्टी झाला व कळवळून त्याने आपल्या केंद्रात ज्वारीच्या चार गाड्या पाठविल्या आहेत. ‘ या पत्रातून सावित्रीबाई फुले यांच्या धाडसी नेतृत्वाचे सारेच गुण सिद्ध होतात.
Reviews
There are no reviews yet.