Description
हिंदू धर्मग्रंथानी मंजूर केलेल्या अनेक सामाजिक चालीरीतींवर त्यांचा आक्षेप असूनही आंबेडकरांनी वारसा हक्काच्या हिंदू कायद्याला मान्यता दिली. त्यांच्या मात या कायद्याने धनिकशाहीची (धनदांडग्यांचे सरकार) निर्मिती रोखली; अग्रजाधिकारामुळे (पहिल्या जन्मलेल्या मुलाचा वारसा हक्क) नक्कीच धनिकशाही आली असती. विखंडन समस्येचे निराकरण करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे सहकारी शेती सुरु करणे आणि त्यात समाविष्ट असलेल्या छोट्या पट्ट्यांच्या मालकांची खाजगी मालकी नष्ट न करता त्यांना शेतीत सामील होण्यास भाग पाडणे असे बाबासाहेबांचे मत होते. भारतातील कृषी समस्यांवर इलाज सुचविताना एकीकडे औद्योगिकीकरणाची वकिली करणे आणि दुसरीकडे सहकारी शेती यांमध्ये कोणताही विरोधाभास त्यांना दिसला नाही. आणि दोन्ही प्रकारणांमध्ये त्यांनी आपल्या युक्तिवादांना जगाच्या इतर भागांतील देशांच्या उदाहरणांसह समर्थन दिले. सिद्धांतापेक्षा अनुभवजन्य पुराव्याने त्यांनी अनेक धोरणात्मक बाबींवर मार्गदर्शन केले आहे असे दिसते.
Reviews
There are no reviews yet.